पण कधी कधी आयुष्य इतके अनपेक्षित वळण घेते ना ज्याची आपण स्वप्नातही कल्पना केलेली नसते. जगण्याचा रादर जीवंत असण्याच त्रास होतो.
प्रत्येकाच्या आयुष्यातील निर्णय चुकतात. माणसं आहोत आपण. चुका तर होणारच. संत महात्मे चुकले, त्यांना कष्ट भोगावे लागले तर मग आपण तर अगदीच सामान्य माणसं आहोत.
खरतर आयुष्य किती क्षणभंगुर आहे. त्यात नवीन रोगांनी ते अजुनच बेभरवशी झाले आहे. आणि आपण किती छोटे, आखूड, कूंचीत विचार करून ते अजुनच अवघड करतो आहोत असे वाटत नाही का ??