Skip to content Skip to sidebar Skip to footer

सुपारीचा खेळ…आणि मुलीचा स्वभाव…

कीर्ती खूप शांत स्वभावाची मुलगी आणि विशेष म्हणजे खिलाडूवृत्तीची मुलगी म्हणजे कुठेही अन्याय झाला  की कीर्तीला खपत नसे मग आपलं म्हणं पटवून देण्यासाठी इकडचा डोंगर तिकडे करणारी,आपल्या कामाशी काम ठेवणारी आणि मैत्रिणीही हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्या.. मुळातच शांत स्वभाव असल्याने गप्पिष्ट स्वभावाची कीर्ती नव्हती म्हणूनच तिची काळजी आई आणि वडिलांना खूप लागून राहत असेएके दिवशी असंच कीर्तीच्या आई आणि वडिलांचं बोलणं चालू होत..

आई –  अहोऐकताय नाआपली कीर्ती केवढी शांत स्वभावाची आहेकसं होईल तीच कोण जाणे..चांगलं घर मिळालं तर बरं होईल..कारण खूपच मनमोकळी आहे हो तीआता बोलत नाही जास्त म्हणून स्वभाव खटकत असेलही तिचा पण तिचीही काही तत्त्व असतील आपल्या जीवनाविषयी..ऐकताय नाआणि पेपर मध्ये का डोकं खुपसून बसलात तुम्हीपरीक्षा आहे का उद्याघरातला प्रश्न सोडवा आधी आपल्या कीर्तीच्या लग्नाचा….

वडील  – अहो….मनोरमाबाईसगळं आपल्या हातात असत का वरती आहे ना बसलेला त्याला सगळी काळजी..आपण फक्त कार्य करायचं

आई   – अहोनिमकर पणअसं घरात बसून हातपाय हलवताच होणार आहे का सगळंकार्य करायला तर हातपाय हलवणार की नाही की ते देवालाच हलवावे लागतील

वडीलमनोरमाबाईअहो बरं उद्याच घेऊन येतो मुलाच्या वडिलांना..मग तर झालं

आई  – खरंच मग आज अचानक सांगताय तुम्हीनशीब तेवढे तरी कष्ट घेतले नाहीतर डायरेक्ट काहीही कळवताच भेटायला आणला असत त्यांनाआता खडीसाखर ठेवते देवापुढं

वडील  – मनोरमाबाईअहो अजून बोलणी तर होऊ देत कीआपला काहीही ठरलंही नाही आणि तुम्ही मात्र मनात मांडे भाजत बसलात

आई   – असू देत होनिमकर..खूप मस्त वाटतंय बातमी ऐकून म्हणून आपलं दाखवला नैवेद्य

ठरवल्याप्रमाणे कीर्तीच्या वडिलांनी त्यांच्या मित्राला घरी चहापानासाठी बोलावलंमग फक्त दाखवण्याचा कार्यक्रमही झाला नाही तिचा फक्त मिस्टर निमकरांचे मित्र कीर्तीला पाहून आणि तिच्याशी बोलून निघाले..मग मुलाला विचारून कळवतो असं त्यांनी सांगितलं आणि आपल्या मित्राचा निरोप घेऊन निघाले..

आणि तेही मनोमनी खूप खुश होते आणि नंतर परत आपल्या मुलाला घेऊन येतो असं आश्वासनही त्यांनी कीर्तीच्या वडिलांना दिलंचारपाच दिवसांनी दोघेजण कीर्तीच्या घरी भेटायला म्हणून आले आणि कीर्तीला पसंत केलं..आणि पसंत करून गेल्यावर मनोरमाबाई आणि मिस्टर निमकरांची झालेली चर्चा

आई   – अहोनिमकर ऐकलंत कास्थळ अगदी उजवं आहे हो आपल्या कीर्तीसाठीनाव पण अगदी साजेसं आहेजावईबापूंचयश मोहितेआपल्या मुलीचं नाव कीर्ती आणि जावईबापूंच यशखरंच कीर्ती आणि यश

वडीलनावाचं काय घेऊन बसलात तुम्हीमी यांची नोकरी पाहून पसंत केलंय त्यांना सी.. आहे माझा जावई..महिन्याला कमावतात की लाखभर रुपयेतुम्हा बायकांना काय नावाचं पडत काय माहिती…!

आई   – स्वभाव कसा आहे काय माहितीमला तरी काही वाईट नाही वाटले होआपल्या मुलीच्या हेकेखोरपणाबद्दल काळजी वाटते बस्स

वडील  – अहोझाली का शंका काढायला सुरुवात..तुम्ही बायका म्हणजे ना कहर आहात नुसत्याआणि आता नाही का तुम्हालागोडाचा नैवेद्य करायचाजा आणि चांगला शेवयाच्या खीरीचा नैवेद्य दाखवा

आई    – अगदी सांगायची गरज नाही हाआम्हा बायकांना तेवढ कळत बरं

अगदी थाटामाटात कीर्ती आणि यशचा लग्नसोहळा पार पडला आणि कीर्ती स्वभावाने शांत असल्याने सगळीकडे मिसळायला आणि वावरायला जरा वेळच लागला लग्न झाल्यावर सुपारी आणि हळद खेळताना याचा प्रत्यय सर्वांनाच आला….कारण मुलीचा स्वभाव ओळखण्यासाठी म्हणून हे खेळ खेळले जातात याची कल्पना सासरकडच्यांना होती परंतु कीर्तीला याबाबतीत काहीच माहिती नव्हतीसुपारी खेळतानाचा एक प्रसंग

 कीर्तीच्या नणंदबाई सकाळी लवकर उठूनच तयार होत्या..मग कीर्ती उठली आणि पंकजा ताईंनी म्हणजेच नणंदबाईनी कीर्तीला जुनी वापरातली साडी नेसायला सांगितलीआणि कीर्तीही साडी नेसून आली आणि सुपारीचा खेळ खेळायला बसलीदोन मस्त पाट मांडले होते..आणि एका खोलगट मोठ्या भांडयात कुंकवाचं पाणी होतं आणि यश आणि कीर्ती दोघांनाही पाटावर बसायला सांगितले तसे नंणंदबाईनी आपल्या बोटातली अंगठी पाण्यात टाकली आणि दोघानांही पाण्यातून काढायला सांगितली ज्याला पहिली अंगठी सापडली तो जिंकला आणि ज्याला नाही सापडली तो हरला आणि मग यश तीनही वेळेस जिंकला मग मात्र कीर्तीची खिलाडूपणा जागा झालात्यानंतर सुपारीचा खेळ कीर्तीला काहीही करून जिंकायचा होता मग तिने तसा प्रयत्न करायचं ठरवलं मग मात्र कीर्ती अगदी पदर खोचून तयार होतीमग सुपारी कशी पकडायची आणि हातातून कशी काढायची हे दोघांनाही समजावले की, मुलीने दोन हातानी सुपारी सोडायची आणि मुलाने फक्त एका हाताने सुपारी सोडायची मग कीर्तीला आधी अंगठी शोधता आली नाही म्हणून ती कसर या सुपारीच्या खेळात भरून काढणार होती,

पंकजा  – कीर्तीअगं काढ सुपारी दादाच्या हातामधूनबघ बाई संसार तुझ्या हातात आला पाहिजे,सुपारी नाही काढलीस तर गेला संसार यशच्या हाती…[कीर्तीला खिजवत नणंदबाई म्हटल्या]

यश  – हम्मकाढा…[आपली पकड घट्ट केली ]

कीर्ती  – [खूपच आवेशात तिने पकड सोडली आणि सुपारी काढली असं तीनही वेळा कीर्तीने सुपारी काढली ] अय्या….! जिंकले मीमाझ्या हाती संसार

सगळी मंडळी पाहत होती ती आश्चर्याने कारण नवरी मुलगी खूपच डॅशिंग वाटली सगळ्यांना.. त्याचबरोबर जमलेल्या पाहुणे मंडळीतही कुजबुज झाली…बाई ग ..यश पेक्षा कांकणभर जास्तच आहे ही मुलगी,यशच काही खरं नाही….’ नणंदबाई म्हणजे पंकजाताई ही सगळी कुजबुज ऐकत होत्या…आपल्या भावजयीची सगळ्यांनी एवढ्या लवकर पारख केली म्हणून…थोड्या ओशाळल्या होत्या…परिस्थितीच गांभीर्य लक्षात घेऊन उलट भावजयीला म्हणजेच कीर्तीला त्या प्रोत्साहन देत म्हणाल्या 

पंकजा  – चलकीर्तीआता तुझी टर्नसोडू नकोसपकड के रख…!  [कीर्तीने सांगितल्याप्रमाणे पकड घट्ट ठेवली तितक्यात यश म्हणाला] 

यश   – हम्म….सोड की मूठकाय घट्ट पकडलीस मूठ हात दुखतोय माझा

तरीही कीर्तीने खूपच आपली मूठ आवळून पकडली होती काही केल्या यशला मूठ सुटेना कारण एका हाताने सोडायची होती ना..मग खूपच कष्ट घ्यावे लागले पण तरीही कीर्ती मूठ सोडत नव्हती मग बऱ्याच प्रयत्नाने तीनही वेळा यश ला मूठ सोडता आलीच नाही..आणि कीर्ती ला खूप आनंद झाला कारण ती या वेळेला जिंकली होतीमग काय सुनबाईंचं कौतुकच आला बाई संसार हातात..असं लोक हसत हसत म्हणू लागले आणि कीर्ती पण हसू लागली.. .. मग पूजा झाल्यावर घ्यायला पाचपरतवणे साठी कीर्तीच्या माहेरून काही नातेवाईक आले आणि चार दिवसांसाठी कीर्तीला माहेरी पाठवण्यात आले..मग माहेरी आल्या आल्या सासरच्या गमती जमती सांगू लागली

कीर्ती – आईतुला काय सांगूकाय मज्जा आली काल खेळ खेळताना..

आई  – मज्जासांग बरं तुझी मज्जा..?

कीर्ती – अगं..आई मला अंगठी पहिल्या खेळात सापडली नाहीपण दुसऱ्या खेळात मात्र माझीच बाजी

होती..मीच जिंकले नंतरकाय त्रास झाला त्यांना माझी मूठ उघडताना त्यांना काही केल्या उघडताच नव्हती माझी मूठहाहा..[असे म्हणून मोठ्याने हसू लागली]

आई – काय ? तू असं वागलीस तिथं..काय वाटलं असेल त्यांनाअगं संसार सांभाळायचा म्हणजे असं करून नाही चालत..

कीर्ती – आई….इट्स गेम यार….सो लिव्ह इट…!

आई लिव्ह इट कायअगं तू किती हट्टी आणि खुनशी आहेस हे कळलं सगळ्यांनाअगं संसार म्हणजे काय स्पर्धा असती का? हार काय जीत काय सगळं माफ असतं गंआणि घरातल्यांशी कसली स्पर्धा करतेसकिती त्रास झाला असेल जावईबापूंना हात दुखत असतील कितीत्रास झाला असेल त्यांना..अगं बाळा मुलीचा स्वभाव कसा आहे हे जाणून घेण्यासाठी असले खेळ लग्नानंतर खेळावे लागतात किंवा खेळायला लावतात

कीर्तीमला माहिती नव्हतं गं आईकाय करू आता मी

आई  – काही करू नकोसफक्त संसारात स्पर्धा करू नकोस एकमेकांशीआणि नीट वाग आपला हेकेखोरपणा आणि खुनशी स्वभाव सोडआणि दुसर्यांना त्रास होऊ नये हे ही संसारात पाहावं लागत तू तर खेळातच आपली चमक दाखवलीस

कीर्ती   – आईबरं झालं मला सांगितलंस सगळंमी काळजी घेईल इथून पुढे

असं चांगले विचार सांगूनमनोरमाबाईंनी चार दिवसांनी आपल्या लेकीची बोळवण केलीआणि कीर्तीही आपल्या संसारात एकदम रमली.

तात्पर्य – संसारात एकमेकांशी स्पर्धा करून चालत नाही..एकमेकांची काळजी घेण्यातच आपलं हीत असतं,खुनशी स्वभाव गरज असलेल्या ठिकाणीच वापरावा…

प्रिय वाचक मित्रहो आजच्या पिढीतल्या मुलींना आपल्या चाली-रीती,परंपरा माहिती नसतात…लग्नानंतर हळद फेडताना सुपारीचा खेळ हमखास खेळला जातो,खेळ खेळताना कोण हरतं आणि कोण जिंकत हे महत्वाचं नसतं…महत्वाचं असत ते फक्त एकमेकांना त्रास होऊ न देणं…पण आपल्या मुली अंगी असलेल्या खिलाडू वृत्तीमुळे किंवा अल्लड स्वभावामुळे.. महत्व कशाला द्यावं ही गोष्ट विसरूनच जातात…कथेतील नायिका कीर्ती अशाच स्वभावाची म्हणून सासरी हळद फेडताना तिची नेमकी कुचंबणा होते म्हणून..सासरकडच्यांच्या नजरेत तिचा स्वभाव लवकर कळतो…हेखेखोरपणा,स्पर्धा या सगळ्या संसारातल्या डाव्या बाजू आहेत हेच या लेखाद्वारे सर्वांना सांगण्याचा छोटासा प्रयत्न…

==============

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.