
अंजलीने परत आपला मोर्चा आपली आवड जोपासण्यावर केला…मग अंजलीच्या वडिलांनी एका कवी सम्मेलनाची तिकिटे काढून आणली…अगदी दिगग्ज कवी तिथे उपस्थित राहणार होते…अंजलीनेहि खूप आनंदाने संमेलनासाठी जाण्याचं ठरवलं…अगदी सकाळपासून ते संध्याकाळ पर्यंत संमेलन चालू होत मग अंजली आदल्यादिवशीच तयारीला लागली कारण अंजली एकटीच संमेलनाला हजेरी लावणार होती…कारण छोट्या आरवला गर्दीमध्ये नेणं जमणार नव्हतं म्हणून अंजली लगबगीनं तयारी करत होती आणि पहिल्याच रांगेतला तिकीट अंजलीला मिळालं होतं म्हणून अंजली भलतीच खुश होती…मस्त मोरपिशी रंगाची साडी तिने निवडली होती,त्यावर मस्त मोरपिशी रंगाची साडी तिने निवडली होती,त्यावर मस्त साऊथ इंडियन झुमके अशी तयारी तिने केलेली.
संमेलनाचा दिवस उजाडला..अंजली खूपच लगबगीने आवरा-आवर करत होती..गडबडीत जेवायलाही विसरत होती पण आई ओरडली म्हणून कसेबसे घास पोटात टाकले…ते म्हणतात ना ‘आपल्या आवडीची गोष्ट असेल तर कसलेच भान राहत नाही ‘ तसं अंजलीच झालं होत मग मस्त मोरपिशी रंगाची साडी त्यावर साऊथ इंडियन झुमके आणि केसांचा मस्त असं अंबाडा गुंफलेला त्यावर चाप्याची वेणी गुंफली होती आणि खूप सुंदर दिसत होती..आईने मग आपल्या लेकीची दृष्ट काढली आणि म्हणाली…
अंजली – आई …अगं…बस…बस…किती दृष्ट काढशील आणि आत्ता कोण पाहणार आहे मला…
आई – अंजु…गप्प बस…अजूनही किती सुंदर आहेस तू…आणि बघ अजूनही मला तुझं लग्न व्हावं असं वाटतंय..
अंजली – नाही ग आई…आता लग्न या गोष्टीवर माझा अजिबातच विश्वास राहिला नाहीय ..एकदा केलेली चूक मला परत नाही करायचीय…जाऊ दे संमेलन सुरु होईल मला उशीर होतोय…आरव च जेवण झालच आहे त्याला झोपायला सांग..नाहीतर पित्त होईल त्याला..चल निघते मी..
असे म्हणून अंजली आईचा निरोप घेते आणि साधारण तासाभराने संमेलनात पोचते आणि आवर्जून पहिल्याच रांगेमध्ये बसते …एकापाठोपाठ एक अशा दिग्गज कवींचे आपले कविता सादरीकरण सुरु असते .. ..अंजलीही ऐकण्यात मग्न असते…साधारण ५-६ कवीची सादरीकरण झाली असतील…मग निवेदकाने अनुराग असे नाव अनाऊन्स केलं तसं अंजलीनेही चमकून पाहिलं तर…त्या कवीच वय साधारण ३२ -३३ पर्यंत असेल, डोळ्यावर चष्मा गळ्यात शबनम,उंच अशी शरीरयष्टी आणि त्याने फक्त कवितेचं शीर्षक वाचलं ‘माझ्या आठवणीतली ती..’ आणि अंजलीच मन १५ वर्ष मागे गेलं आणि अजयची आठवण झाली आणि मग पूर्ण कविता झाल्यावर अंजलीला खात्री पटली कि हाच…हाच…तो अजय कुलकर्णी ….म्हणजेच अंजलीचा लाडका कवी ‘अनुराग’…पूर्ण कविता झाली तरीही अंजली एकटक अजयकडेच पाहत राहिली… …कारण अजयची कारकीर्द म्हणजे कॉलेजच्या
काव्यवाचनापासूनच सुरु झालेली होती..ती म्हणजे जिच्याकडे पाहून त्याला कविता सुचत असे ती म्हणजे अंजली…पण अंजलीला हि गोष्ट नव्हती माहिती कारण अंजली अजयला फक्त एक चांगला मित्रच समजत होती…आणि अजयच्या कवितांच्या प्रेमात पडली होती म्हणजे अजयच्या कविमनावर अंजली प्रेम करत होती…
अजयने मात्र आपल्या कवितांचा आलेख खूपच वाढवला होता..बऱ्याच चित्रपटांसाठी अजयने कविता लिहिल्या होत्या…आणि मोठ्या कवीच्या यादीत अजयचे नाव मानाने लिहिले गेले होते आणि मोठे मोठे डायरेक्टर्स आणि प्रोड्युसर अजयच्या अपॉइंटमेंट साठी वर्षानुवर्षे वाट पाहत असत अंजली मात्र अजयकडे एकसारखी पाहतच होती..आणि जेव्हा भानावर आली तेव्हा संमेलन संपून गेलं होत आणि सभागृह हळू हळू रिकामं होऊ लागलं होत पण कवी ‘अनुराग’ च्या भोवती चाहत्यांचा गराडा होता…आणि अंजली अजयला भेटण्यासाठी धडपडत होती…मग एका रांगेत सगळे उभे राहून अजयची स्वाक्षरी घेत होते त्यात अंजलीही उभीच होती…का कोण जाणे आज अंजलीने लग्नातलं अजयने दिलेलं गिफ्टही आणलं होतं…मग अंजलीला वाटले आता अजय काही आपल्याला ओळखणार नाही, जेव्हा स्वाक्षरी घेण्यासाठी अंजलीचा नंबर आला तेव्हा अंजलीने मुद्दाम चांदीचे गुलाबाचे फुल अजयसमोर ठेवले…आणि म्हणाली, ” कदाचित…आत्ता तुम्ही मला ओळखाल..! ” अजयही बोलला ”हे गिफ्ट दाखवला नसतं तरीही मी तुम्हाला ओळखलंच असतं…कारण आज मी इथपर्यंत पोहोचलोय याच खरं श्रेय तुम्हालाच जात ” ! अंजली तशी चमकून म्हणाली…”ते कसं काय ” ? आणि अजय म्हणाला, ” होय..कारण तुमच्याकडेच पाहून कविता कशी करायची हे समजलं ” हे वाक्य पूर्ण होत न होत तोच अंजलीला कुणीतरी मागे खेचलं आणि म्हणलं , ” काय हे आम्ही काय वेडे म्हणून थांबलोय का इथे…आवरा पटकन ” हा आवाज अंजलीने ऐकला तशी अंजली झर्र्कन मागे झाली आणि आपल्या अश्रुना बांध मोकळा करून दिला…हमसून हमसून रडू लागली…खरंच आपण अजयच्या कायमच तर आठवणीत राहिलो…हे अंजलीला कळून चुकले…
अंजलीला मात्र तिचे मन सारखे-सारखे खात राहिले आणि कॉलेजचे दिवस पुन्हा तरळू लागले..आणि आपली चूक उमगली कि , अजयने आपल्यामुळेच कॉलेज सोडले…आपणच आपल्या आयुष्याचं वाटोळं करून टाकलं..खरंच अजय खूप प्रेम करत होता हे अंजलीला त्या दिवशी कळले…
अंजलीने तर आपला संसार थाटला …पण अजयच्या तर मनात अंजली कायमची आठवणीत राहिली….खरंच कायमची आठवणीत….
समाप्त…..!
Post navigation

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.