श्री हनुमान चालीसा मराठी मराठी भावार्थासह

१. हनुमान चालीसा कुणी लिहिली?
hanuman chalisa marathi: आपल्या हिंदू धर्मात खूप देवी देवता आहेत. पण या देवी, देवतांची आठवण आपल्याला सणासुदीच्या निमित्ताने होते नाहीतर मग आपण अडचणीत असताना होते. मग अशा वेळी कोणत्या देवाला साकडे घालू आणि कोणत्या देवाची प्रार्थना करू म्हणजे माझी अडचण लवकर संपेल असा प्रश्न आपल्याला पडतो. अडचण जर फारच गंभीर स्वरूपाची असेल तर मग एखादे तज्ञ पंडित म्हणजेच गुरुजी शोधून मग त्यांना उपाय विचारतो आपण. अशा वेळी अशा देवतांची उपासना करायला हवी जे देव या कलियुगात ही जागृत आहेत आणि त्यांची उपासना केल्याने लवकर प्रसन्न होऊन आपले संकट निवारण करतात. त्यामुळेच आज अशा एका स्तोत्राची माहिती करून घेणार आहोत ह्याचे नित्य पठण केल्याने संकटे दूर तर होतातच पण प्रत्येक अडचणीतून मार्ग मिळतो.
कलियुगात जागृत असणारे आणि भगवान श्री रामाचे परमभक्त असणारे भगवान हनुमान यांची हनुमान चालीसा खूप प्रसिद्ध आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की, भगवान हनुमान हे श्री रामाचे परमभक्त होते आणि बाल ब्रह्मचारी होते. त्यांची अनेक मंदिरे संपूर्ण देशात आहेत. भगवान हनुमान हे सदैव जागृत आणि भक्तांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे दैवत आहे. हनुमान यांची अनेक नावे आहेत, बजरंगबली, पवनपुत्र, मारुतीनंदन, केसरी नंदन, महावीर. हनुमान सप्त चिरंजीवांपैकी एक आहेत. हिंदू धर्मात हनुमान हे शौर्य, शक्ती आणि धैर्याचे प्रतीक मानले जाते.
हनुमान चालीसा ही अवधी भाषेत केलेली काव्यरचना आहे. त्यात रामभक्त हनुमानाच्या गुणांचे वर्णन केले आहे. हे एक अतिशय लघु काव्य आहे. ज्यामध्ये पवनपुत्र हनुमानाची सुंदर प्रशंसा केली गेली आहे. यामध्ये केवळ बजरंग बलीच नाही, तर प्रभू श्रीरामांचे व्यक्तिमत्त्वही सोप्या शब्दात कोरलेले आहे. चालीसा शब्दाचा अर्थ ‘चाळीस’ असा आहे कारण या स्तुतीमध्ये दोन कडव्यांच्या परिचय वगळता चाळीस श्लोक आहेत. हे काव्य गोस्वामी तुलसीदास यांनी लिहलेले आहे.
२. हनुमान चालीसा
|| दोहा ||
श्री गुरु चरन सरोज रज,
निज मनु मुकुर सूधारि।
बरनऊं रघुबर बिमल जसु,
जो दायकु फल चारि॥
बुद्धिहीन तनु जानिके,
सुमिरौं पवन-कुमार।
बल बुद्धि बिद्या देहु मोहिं,
हरहु कलेस विकार॥जय हनुमान, ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुँ लोक उजागर॥ १ ॥राम दूत अतुलित बल धामा।
अंजनि पुत्र पवनसुत नामा॥ २ ॥महावीर विक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी॥ ३ ॥कंचन बरन बिराज सुबेसा।
कानन कुंडल कुंचित केसा॥ ४ ॥हाथ बज्र औ ध्वजा बिराजै।
काँधे मूँज जनेऊ साजै॥ ५ ॥शंकर सुवन केसरी नंदन।
तेज प्रताप महा जग बंदन॥ ६ ॥विद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर॥ ७ ॥प्रभु चरित्र सुनिबे को रसिया।
राम लखन सीता मन बसिया॥ ८॥सूक्ष्म रूप धरी सियहिं दिखावा।
बिकट रूप धरि लंक जरावा॥ ९॥भीम रूप धरि असुर सँहारे।
रामचन्द्र के काज सँवारे॥ १० ॥लाय सँजीवनि लखन जियाए।
श्रीरघुबीर हरषि उर लाए॥ ११ ॥रघुपति कीन्हीं बहुत बड़ाई।
तुम मम प्रिय,
भरतहि सम भाई॥ १२ ॥
सहस बदन तुम्हरो जस गावैं।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं॥ १३ ॥
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा।
नारद सारद सहित अहीसा॥ १४ ॥
जम कुबेर दिक्पाल जहाँ ते।
कबी कोबिद कहि,
सकैं कहाँ ते॥ १५ ॥
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा।
राम मिलाय राजपद दीन्हा॥ १६ ॥
तुम्हरो मन्त्र बिभीषन माना।
लंकेश्वर भए सब जग जाना॥ १७ ॥
जुग सहस्र जोजन पर भानू।
लील्यो ताहि मधुर फल जानू॥ १८ ॥
प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं।
जलधि लाँघि गये,
अचरज नाहीं॥ १९ ॥
दुर्गम काज जगत के जेते ।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥ २० ॥
राम दुआरे तुम रखवारे।
होत न आज्ञा बिनु पैसारे॥ २१ ॥
सब सुख लहै तुम्हारी शरना।
तुम रक्षक काहू को डरना॥ २२ ॥
आपन तेज सम्हारो आपै।
तीनौं लोक हाँक ते काँपे॥ २३ ॥
भूत पिशाच निकट नहिं आवै।
महाबीर जब नाम सुनावै॥ २४ ॥
नासै रोग हरै सब पीरा।
जपत निरंतर हनुमत बीरा॥ २५ ॥
संकट तें हनुमान छुड़ावै।
मन क्रम बचन ध्यान जो लावै॥ २६ ॥
सब पर राम तपस्वी राजा।
तिन के काज,
सकल तुम साजा॥ २७ ॥
और मनोरथ जो कोई लावै।
सोहि अमित जीवन फल पावै॥ २८ ॥
चारों जुग परताप तुम्हारा।
है परसिद्ध जगत उजियारा॥ २९ ॥
साधु संत के तुम रखवारे।
असुर निकंदन राम दुलारे॥ ३० ॥
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता।
अस बर दीन्ह जानकी माता॥ ३१ ॥
राम रसायन तुम्हरे पासा।
सदा रहो रघुपति के दासा॥ ३२ ॥
तुम्हरे भजन राम को पावै।
जनम जनम के दुख बिसरावै॥३३॥
अंत काल रघुबर पुर जाई।
जहाँ जन्म हरिभक्त कहाई॥ ३४॥
और देवता चित्त न धरई।
हनुमत सेइ सर्व सुख करई॥ ३५॥
संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा॥ ३६॥
जय जय जय हनुमान गोसाईं।
कृपा करहु गुरुदेव की नाईं॥ ३७॥
जो शत बार पाठ कर कोई।
छूटहि बंदि महा सुख होई॥ ३८ ॥
जो यह पढ़ै हनुमान चालीसा।
होय सिद्धि साखी गौरीसा॥ ३९ ॥
तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजै नाथ हृदय महँ डेरा॥ ४० ॥
पवनतनय संकट हरन,
मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित,
हृदय बसहु सुर भूप॥
२. हनुमान चालीसा पठण फायदे
- हनुमान चालीसाचे पठण केल्याने हनुमान जीची विशेष कृपा प्राप्त होते.
- बजरंग बली या कलियुगातील जागृत देवता आहेत. ज्याला हनुमानजीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागत नाही.
- रोज हनुमान चालीसाचे पाठ केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. कसलीही समस्या असो, हनुमान चालीसाचा पाठ केल्याने समस्या दूर होते.
- आत्मविश्वास वाढतो
- भीतीपासून मुक्ती मिळते
- आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते.
- कामात व्यत्यय येत नाही
माणसाला प्रत्येक कामात यश मिळू लागते. - नकारात्मकता दूर होते.
- रोज हनुमान चालीसाचे पाठ केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. कसलीही समस्या असो, हनुमान चालीसाचा पाठ केल्याने समस्या दूर होते.
- आत्मविश्वास वाढतो.
-भीतीपासून मुक्ती मिळते. - आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळते.
- कामात व्यत्यय येत नाही
माणसाला प्रत्येक कामात यश मिळू लागते. - नकारात्मकता दूर होते
रोज हनुमान चालीसाचे पठण केल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो. - रोगांपासून मुक्ती मिळते.
- इच्छा पूर्ण होतात
हनुमान चालीसाचे नियमित पाठ केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. हनुमानजीच्या भक्तांवर कोणाचीही वाईट नजर पडत नाही.
३. श्री हनुमान चालीसा मराठी भावार्थसह | hanuman chalisa marathi
|| दोहा ||
श्री गुरु चरन सरोज रज,
निज मनु मुकुर सूधारि।
बरनऊं रघुबर बिमल जसु,जो दायकु फल चारि॥
अर्थ – श्री गुरू यांच्या चरण कमळाच्या धुळीने, आपले मन रुपी दर्पण,पवित्र करून श्री राम यांचे निर्मळ यशाचे वर्णन करीत आहे.जे चारही प्रकारचे फळ म्हणजे धर्म, अर्थ,काम आणि मोक्ष देणारे आहे.
बुद्धिहीन तनु जानिके,
सुमिरौं पवन-कुमार।
बल बुद्धि बिद्या देहु मोहिं,हरहु कलेस विकार॥
अर्थ – हे पवनकुमार मी आपले स्मरण करीत आहे. माझे शरीर आणि बुध्दी दोन्हीही अशक्त आहे. कृपा करून मला बळ, बुध्दी आणि ज्ञान देऊन माझे सर्व दुःख, दोष, क्लेश यांचा नाश करा.
जय हनुमान, ज्ञान गुन सागर।
जय कपीस तिहुँ लोक उजागर॥ १ ॥
अर्थ- श्री हनुमानजी तुमचा जयजयकार असो. आपण गुण आणि ज्ञानाचे सागर आहात. हे कपिश्र्वर, आपला जयजयकार असो, तिनही लोकात म्हणजे स्वर्ग लोक,भुलोक, पातळ लोकात आपली किर्ती आहे.
राम दूत अतुलित बल धामा।
अंजनि पुत्र पवनसुत नामा॥ २ ॥
अर्थ – हे पवनसुत अजनी नंदन तुमच्या सारखा दुसरा कोणीच बलवान नाही.
महावीर विक्रम बजरंगी।
कुमति निवार सुमति के संगी॥ ३ ॥
अर्थ – हे महविर विक्रम बजरंग बली, तूम्ही विशेष पराक्रमी आहात. तुम्ही दुर्बुद्धिचा नाश करतात आणि सदबुद्धी ठेवणाऱ्या व्यक्ती सोबत असतात.
कंचन बरन बिराज सुबेसा।
कानन कुंडल कुंचित केसा॥ ४ ॥
अर्थ – आपण सोनेरी रंग, सुंदर वस्त्र, कानात कुंडल, आणि कुरळ्या केसांनी सुशोभित आहात.
हाथ बज्र औ ध्वजा बिराजै।
काँधे मूँज जनेऊ साजै॥ ५ ॥
अर्थ – आपल्या हातात वज्र आणि ध्वजा आहे. खांद्यावर मुंज जनऊ ची शोभा आहे.
शंकर सुवन केसरी नंदन।
तेज प्रताप महा जग बंदन॥ ६ ॥
अर्थ – हे भगवान शंकराचे अवतार , हे केशरी नंदन अपल्या पराक्रम आणि यशाचे गुणगान संपूर्ण विश्व करत आहे.
विद्यावान गुनी अति चातुर।
राम काज करिबे को आतुर॥ ७ ॥
अर्थ – आपण प्रचंड विद्यावन, गुणवान, अत्यंत कार्य कुशल असुन श्रीरामाचे कार्य करण्यास आतुर असतात.
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया।
राम लखन सीता मन बसिया॥ ८॥
अर्थ – आपल्याला श्री रामाचे चरित्र ऐकण्यास आनंद प्राप्त होतो. श्री राम, सीता आणि लक्ष्मण तुमच्या हृदयात सहवास करतात.
सूक्ष्म रूप धरी सियहिं दिखावा।
बिकट रूप धरि लंक जरावा॥ ९॥
अर्थ – आपण अती क्षुष्म रुप सीता मातेला दाखवले, तर भयंकर रुप धारण करुन लंकेचे दहन केले.
भीम रूप धरि असुर सँहारे।
रामचन्द्र के काज सँवारे॥ १० ॥
अर्थ – आपण भिमकाय रुप धारण करून राक्षसांचा नाश केला. आणि श्री रामाचे उद्दिष्ट यशस्वी केले.
लाय सँजीवनि लखन जियाए।
श्रीरघुबीर हरषि उर लाए॥ ११ ॥
अर्थ – तुम्ही संजीवनी बुटी आणून लक्ष्मनाला जीवनदान दिले. त्यामुळे प्रभु श्रीरामानी आनंदित होऊन तुम्हाला आलिंगन दिले.
रघुपति कीन्हीं बहुत बड़ाई।
तुम मम प्रिय,भरतहि सम भाई॥ १२ ॥
अर्थ – श्री रामचंद्र यांनी तुमची खूप प्रशंसा केली आणि म्हणाले की तुम्ही भरत सार सारखे माझे प्रिय भाऊ आहात.
सहस बदन तुम्हरो जस गावैं।
अस कहि श्रीपति कंठ लगावैं॥ १३ ॥
अर्थ – श्री राम आलिंगन देतात आणि म्हणतात की तुझे यश हजार मुखांनी उल्लेखनीय आहे
सनकादिक ब्रह्मादि मुनीसा।
नारद सारद सहित अहीसा॥ १४ ॥
अर्थ – श्री सनक, श्री सनंदन, श्री सनतकुमार, श्री सनातन,मुनी ब्रम्हा, नारद मुनी, शेषनाग , सरस्वती जी सर्व तुमचे गुण गातात.
जम कुबेर दिक्पाल जहाँ ते।
कबी कोबिद कहि,सकैं कहाँ ते॥ १५ ॥
अर्थ – यमराज, कुबेर इ. सर्व दिशांचे रक्षक, कवी विद्वान, पंडित किंवा कोणीही आपल्या कीर्तीचे पूर्ण वर्णन करू शकत नाही.
तुम उपकार सुग्रीवहिं कीन्हा।
राम मिलाय राजपद दीन्हा॥ १६ ॥
अर्थ – तुम्ही सुग्रीव आणि श्री राम यांची भेट करुन सुग्रीव जिन वर उपकार केले. सुग्रीवला राजपद मिळवून दिले.
तुम्हरो मन्त्र बिभीषन माना।
लंकेश्वर भए सब जग जाना॥ १७ ॥
अर्थ – बिभीषण ज्यानी आपल्या उपदेशाचे पालन केले. त्यामुळे ते लंकेचे राजा बनले.हे सर्व जगाला माहित आहे.
जुग सहस्र जोजन पर भानू।
लील्यो ताहि मधुर फल जानू॥ १८ ॥
अर्थ – जो सुर्य इतक्या योजन लांब आहे, की त्याच्याजवळ पोहचायला हजारो युग लागतील. दोन हजार योजन लाबिवर असलेल्या सूर्याला तूम्ही एक गोड फळ समजून गिळून घेतल.
प्रभु मुद्रिका मेलि मुख माहीं।
जलधि लाँघि गये,अचरज नाहीं॥ १९ ॥
अर्थ – तुम्ही श्री रामाची अंगठी तोंडात धरून संपूर्ण समुद्र पार केला, यात काहीही आश्चर्य नाहि.
दुर्गम काज जगत के जेते ।
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते॥ २० ॥
अर्थ – या जगात जितके काठीनाहून कठीण काम आहे,ते तुमच्या कृपेने सहज होतात.
राम दुआरे तुम रखवारे।
होत न आज्ञा बिनु पैसारे॥ २१ ॥
अर्थ – तुम्ही श्री रामचंद्रजींच्या दरवाज्याचे रक्षक आहात, ज्यामध्ये तुमच्या परवानगीशिवाय कोणालाही प्रवेश मिळत नाही, म्हणजेच राम कृपा तुमच्या आनंदाशिवाय दुर्मिळ आहे. तुमच्या प्रशांशेशिवाय श्री राम कृपा दुर्लभ आहे.
सब सुख लहै तुम्हारी शरना।
तुम रक्षक काहू को डरना॥ २२ ॥
अर्थ – जो तुम्हाला शरण येतो,त्या सर्वांना आनंद प्राप्त होतो. तूम्ही रक्षक असताना कुठल्याच प्रकारचे भय राहत नाही.
आपन तेज सम्हारो आपै।
तीनौं लोक हाँक ते काँपे॥ २३ ॥
अर्थ – तुमच्याशिवाय, तुमचा वेग कोणीही रोखू शकत नाही.तुमच्या गर्जनाने तिन्ही लोकात थरकाप होतो.
भूत पिशाच निकट नहिं आवै।
महाबीर जब नाम सुनावै॥ २४ ॥
अर्थ – जेथे महावीर हनुमान यांचे नाव उच्चारले जाते, तेथे भूत पिशाच जवळपासही भटकत नाही.
नासै रोग हरै सब पीरा।
जपत निरंतर हनुमत बीरा॥ २५ ॥
अर्थ – वीर हनुमान तुमचे निरंतर जप केल्याने सर्व रोग निघून जातात आणि सर्व त्रास नष्ट होतात.
संकट तें हनुमान छुड़ावै।
मन क्रम बचन ध्यान जो लावै॥ २६ ॥
अर्थ – हे हनुमान विचारात, कृती करण्यात, बोलण्यात ज्यांचे लक्ष नेहमी तुमच्यात असते, त्यांना सर्व संकटापासून तुम्ही सोडवतात.
सब पर राम तपस्वी राजा।
तिन के काज,सकल तुम साजा॥ २७ ॥
अर्थ – तपस्वी राजा श्री राम सर्वात श्रेष्ठ आहेत, तूम्ही त्यांची सर्व कामे सहज केले.
और मनोरथ जो कोई लावै।
सोहि अमित जीवन फल पावै॥ २८ ॥
अर्थ – ज्याच्यावर तुमची कृपा आहे, त्यानें कुठलीही इच्छा व्यक्त केली तर त्याला असे फळ मिळते की त्याची आयुष्यात काही सीमा नाही.
चारों जुग परताप तुम्हारा।
है परसिद्ध जगत उजियारा॥ २९ ॥
अर्थ – आपली किर्ती चारही युगात, सत्युग, त्रेतायुग, द्वापार, कली युगात पसरली आहे. आपली किर्ती जगात सर्वत्र प्रकाशित आहे.
साधु संत के तुम रखवारे।
असुर निकंदन राम दुलारे॥ ३० ॥
अर्थ- हे श्री रामाचे प्रिय, तुम्ही सज्जनांचे रक्षण करता आणि दुष्टांच्या नाश करतात.
अष्ट सिद्धि नौ निधि के दाता।
अस बर दीन्ह जानकी माता॥ ३१ ॥
अर्थ – तुम्हाला श्री जानकी माते कडून अस वरदान भेटला आहे, ज्याद्वारे तूम्ही कोणालाही आठ सिद्दी आणि नऊ निधी देऊ शकता.
राम रसायन तुम्हरे पासा।
सदा रहो रघुपति के दासा॥ ३२ ॥
अर्थ – तुम्ही निरंतर रघुनाथांच्या आश्रयमध्ये राहतात. तुम्हाला म्हातारपण आणि असाध्य रोगाचे निर्मूलन करण्यासाठी राम नामाचे औषधी आहे.
तुम्हरे भजन राम को पावै।
जनम जनम के दुख बिसरावै॥३३॥
अर्थ – तुमची पूजा केल्याने श्री रामांची प्राप्ती होते. जन्म- जन्मांतराचे दुःख दूर होते.
अंत काल रघुबर पुर जाई।
जहाँ जन्म हरिभक्त कहाई॥ ३४॥
अर्थ – अंत काळी श्री रघुनाथ धामाला जातात.आणि जर पुन्हा जन्म घेतला तरी पण भक्ती करतील, रामभक्त म्हणुन ओळखले जातील.
और देवता चित्त न धरई।
हनुमत सेइ सर्व सुख करई॥ ३५॥
अर्थ – हे हनुमान, तुमची सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख मिळतात. मग दुसऱ्या कुठल्या देवतांची सेवा करण्याची आवश्यकता नाही.
संकट कटै मिटै सब पीरा।
जो सुमिरै हनुमत बलबीरा॥ ३६॥
अर्थ – हे वीर हनुमान,जो तुमचे एकत राहतो,त्याची सर्व संकट दूर होतात.सर्व त्रास नाहीसे होतात.
जय जय जय हनुमान गोसाईं।
कृपा करहु गुरुदेव की नाईं॥ ३७॥
अर्थ – हे हनुमान स्वामी, तुमचा जयजयकार असो. जय हो, जय हो, कृपाळू होऊन माझ्यावर कृपा करा.
जो शत बार पाठ कर कोई।
छूटहि बंदि महा सुख होई॥ ३८ ॥
अर्थ – जो कोणी या हनुमान चालीसा चे शंभर वेळा पठण करेल,तो सर्व बंधनातून मुक्त होईल आणि त्याला परम आनंदाची प्राप्ती होईल.
जो यह पढ़ै हनुमान चालीसा।
होय सिद्धि साखी गौरीसा॥ ३९ ॥
अर्थ – भगवान शंकर साक्षी आहे की जो कोणी याचे वाचन करेल त्याला नक्की यश भेटेल.
तुलसीदास सदा हरि चेरा।
कीजै नाथ हृदय महँ डेरा॥ ४० ॥
अर्थ – हे नाथ, हनुमान जी, तुलसीदास सदैव श्री रामाचा सेवक आहे. म्हणून तुम्ही त्याच्य हृदयात निवास करा.
|| दोहा ||
पवनतनय संकट हरन,
मंगल मूरति रूप।
राम लखन सीता सहित,हृदय बसहु सुर भूप॥
अर्थ – हे संकट मोचन पवन कुमार, आपण आनंद मंगलाची प्रतिमा आहात.हे देवराज, तूम्ही श्री राम, सीता आणि लक्ष्मण सहित माझ्या ह्रदयात निवास करा.
हेही वाचा
१२ ज्योतिर्लिंग आणि त्यांचे महत्व
रामरक्षा स्तोत्र पठण फायदे आणि प्रचिती
जाणून घ्या तुळशीचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व आणि फायदे
====================
प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.