
संध्याकाळी बऱ्याचदा मुलांनी काही खायला मागितलं तर आपणास प्रश्न पडतो कि रोज रोज काय बनवायचं ? आणि आजकालच्या मुलांची डिमांड तर काही विचारूच नका. त्यांना कधीही विचारलं कि काय खाणार, तर त्यांना साधे पोहे, उपमा नकोच असतात. त्यामुळेच आज आपण झटपट बनणारी , हेल्थी आणि अगदी २-३ साहित्यात बनणारी रेसिपी बघणार आहोत.
आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कधी आपण घरात पाव भाजी बनवली कि पाव शिल्लक राहतात आणि मग दुसऱ्या दिवशी परत पाव भाजी खायची इच्छा नाही होतं. मुलांना तर नेहमी काहीतरी वेगळं खायला हवं असतं. त्यातूनच केलेला हा अतिशय सोपा आणि झटपट प्रयोग.
चीझ पाव बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
पाव – २-३ नग (पाव नसतील तर ब्रेड वापरले तरी काही हरकत नाही)
उकडलेले कॉर्न/मका – १/२ कप (अथवा आवडीनुसार)
चीझ – आवडीनुसार
काळी मिरी पावडर / ब्लॅक पेपर – १ टेस्पून
टोमॅटो सॉस – आवडीनुसार
हिरवी चटणी (कोंथिबीर चटणी ) – तिखट हवं असेल तर टाकावी अथवा ऑप्शनल आहे
चीझ पाव बनवण्याची कृती:
सर्वप्रथम पाव मधून कापून दोन भाग करावे. त्यानंतर त्यावर हिरवी चटनी आणि टोमॅटो सॉस लावावे. त्यावर उकडलेला मका पसरवून घ्यावा.
त्यानंतर आवडीनुसार चीझ टाकावे आणि वरून काळी मिरी पावडर स्प्रिंकल करावी. अशाप्रकारे सगळे पाव तयार करून घ्यावे.
ओव्हन मध्ये जर बनवत असाल तर ओव्हन १५ मिनिटे २०० °C वर प्रीहीट करून घ्यावे. ओव्हन प्रीहीट झाला कि मग चीझ पाव १५ मिनिटांसाठी १८० °C वर बेक करावे.
आणि कढई अथवा कूकर मध्ये बनवत असाल तर सेम प्रोसेस करावी. कढई अथवा कूकर (कूकर ची शिटी आणि रिंग काढून घ्यावी ) १५ मिनिटे झाकण लावून प्रीहीट करावा आणि त्यानंतर १५ मिनिटांसाठी बेक बेक करावे.
गरमागरम टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करावे. नक्की करून बघा लहान मुलासोबतच मोठ्यांनाही आवडेल अशी सोपी आणि चविष्ठ रेसिपी आहे ही.
================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.